| मुंबई | दि.३० जून २०२५ | राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार आहे, मात्र त्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आक्रमकतेतील हवा काढून घेत हिंदी भाषेसंदर्भातील शासन निर्णय रद्द करत असल्याची घोषणा रविवारी करून ठाकरे बंधूंच्या ५ जुलैच्या मोर्चातील हवाच काढून घेतली.
यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिवशेनाच्या पूर्वसंध्येला महायुती सरकारच्या वतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारच्या वतीने हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नरेंद्र जाधव यांचे अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करून या समितीच्या अहवालानंतरच पुढील निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
Tags:
Ahmednagar