जिल्हा बँक शेतकर्‍यांचा विमा स्वनिधीतून उतरिवणार : आ.शिवाजी कर्डिले

पिक कर्जदार शेतकर्‍यांचा रक्कम रुपये 2/- लाख अपघाती विमा जिल्हा सहकारी बँक स्वनिधीतून उतरविणार : बँकेचे चेअरमन माजी मंत्री  शिवाजीराव कर्डिले


। अहिल्यानगर । दि.01 जुन 2025 । अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पिक कर्जदार शेतकर्‍यांचा प्रधानमंत्री राष्ट्रीय सुरक्षा विमा अंतर्गत रुपये 2/- लाखाचा अपघाती विमा जिल्हा बँक आपल्या स्वनिधीतून उतरविणार असल्याचा निर्णय संचालक मंडळ सभेमध्ये झाला असल्याची माहीती बँकेचे चेअरमन माजी मंत्री  शिवाजीराव कर्डिले यांनी दिली. 

👉 क्लिक करा आणि बातमी वाचा...

बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणावर कर्जवितरण करण्यात येत असून जिल्हयाच्या एकूण कर्जवितरणात जिल्हा बँकेचा सिंहाचा बाटा आहे. जिल्हा बँकेचे रुपे किसान क्रेडिट कार्ड धारक शेतकर्‍यांची संख्या चार लाखांच्या वर असून या शेतकरी सभासदांचे अपघाती विमा उतरविणेकरीता बँकेला रक्कम रुपये 80/- लाखांच्या बर खर्च येणार असल्याची माहीती चेअरमन कर्डिले यांनी देवून जिल्हयातील पात्र शेतकर्‍यांनी सोसायटी माध्यमातून पिक कर्ज घेवून बँकेचे रुपे किसान क्रेडिट कार्ड घ्यावेत. 

👉 क्लिक करा आणि बातमी वाचा...

ज्या शेतकर्‍यांनी अद्यापही रुपे किसान क्रेडिट कार्ड घेतलेले नसतील त्यांनी त्वरीत आपल्या बँकेच्या शाखेकडे रुपे किसान क्रेडिट कार्डची मागणी करण्याचे आवाहन चेअरमन आ.कर्डिले व व्हाईस चेअरमन अ‍ॅड.  माधवराव कानवडे यांनी केले.

👉 क्लिक करा आणि बातमी वाचा...

या विम्याबाबत अधिका माहीती देताना बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्षे यांनी सांगितले की, बँकेकडून अपघाती विमा उतरविण्यात येणार्‍या शेतकर्‍यांचा दुर्देवाने अपघाती मृत्यु झाल्यास रुपये 2/-लाखाची भरपाई मिळेल तसेच अपघातात एक अवयव निकामी झाल्यास 50%, दोन अवयव निकामी झाल्यास 100% नुकसान भरपाई मिळणार आहे.

👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग  

परंतू नैसर्गिक मृत्यु झाल्यास कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळणार नाही. ही योजना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री राष्ट्रीय सुरक्षा विमा योजने अंतर्गत असून त्यांचे नियम व अटी यांना लागू राहणार असल्याची माहीती वर्पे यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post