। मुंबई । दि.28 एप्रिल । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत आक्रमक भूमिकेनंतर उत्तरप्रदेशात भोंग्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमधील ११ हजार भोंगे उतरवण्यात आले आहेत.
तसेच ३५ हजार मंदिर-मशिदींनी आवाजावर बंधने घातली आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी योगी सरकारचे आभार मानले आहेत. उत्तर प्रदेशात भोंग्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतल्यानंतर राज ठाकरेंनी योगी सरकारचे आभार मानले आहेत.
उत्तर प्रदेशात भोंगे उतरवल्याने राज ठाकरेंनी योगींचे कौतुक केले आहे. तसेच ‘महाराष्ट्रात योगी कुणीच नाही, फक्त सत्तेचे भोगी’, अशी टीका राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली आहे.
--------------------
विक्रांत बचाव मोहिमप्रकरणी ; सोमैया पितापुत्राला दिलासा
