नातवाच्या अपघाती निधनाच्या धक्क्याने अजोबांचा मृत्यू


। अहमदनगर । दि.13 फेब्रुवारी । रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात नातवाचे मृत्यू झाला. आपल्या नातवाचे अपघाती निधन झाल्याचा धक्का सहन न झाल्यामुळे आजोबांचे निधन झाल्याची दुर्देवी दुःखद घटना ही श्रीगोंद्यामध्ये रविवारी सकाळी घडली आहे.

श्रीगोंदा शहरातील रहिवासी असलेल्या राहुल आळेकर या युवकाचे मध्यरात्री अपघाती निधन झाले. त्याच्या निधनाची बातमी समजल्यानंतर मयत राहुल याचे आजोबा (आईचे वडील) जालिंदर लहानू शिंदे (वय 62, रा.घारगाव) हे

आज (रविवारी) सकाळी अंत्सविधीसाठी आले असता त्यांना नातवाच्या निधनाचा धक्का सहन न झाल्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले त्यानंतर त्यांना शहरातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतू त्यांचा मृत्यू झाला.

नातवाच्या निधनाचा धक्का सहन न झाल्यामुळे आजोबांचा मृत्यू झाल्याच्या या धक्कादायक दुःखद घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post