। अहमदनगर । दि.04 जून । कोरोनाची पहिली व दुसऱ्या लाटे मध्ये नागरिकांनी गांभीर्याने घेतली नसल्यामुळे विविध समस्यांला व गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागले, तज्ञांच्या मते सप्टेंबर व ऑक्टोबर या महिन्यांमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली असून १८ वर्षा खलील मुले बाधित होण्याची शक्यता आहे. मुलांवर उपचार करण्यास व सुविधा देण्यास कुठलीही अडचण येऊ नये यासाठी शहरांतील बालरोग तज्ञांचे मते जाणून घेऊन उपाययोजना करण्यास सुरुवात केली असून कुठेही लहान मुलांचे औषधे, ॲम्बुलन्स,व्हेंटिलेटर कमी पडू देणार नाही तिसऱ्या लाटे करता आम्ही तयार आहोत आणि ती आम्ही येऊ देणार नाही यासाठी उपायोजना करण्यात सुरुवात केली असल्याचे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
आ.संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली मनपा आरोग्य समितीच्या वतीने शहरातील बालरोग तज्ञांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी समितीचे अध्यक्ष डॉ. सागर बोरुडे सदस्य,सचिन जाधव,विपुल शेटीया,डॉ.नानासाहेब अकोलकर,डॉ.सुचित तांबोळी,डॉ. प्रताप पटारे,डॉ.मकरंद धर्मा, डॉ.संदीप गायकवाड,डॉ.गणेश माने,डॉ.दिपक कर्पे,डॉ.सुरेंद्र रच्चा,डॉ.सागर वाघ,डॉ.सचिन वहाडणे,डॉ. दिलीप बागल, डॉ.श्याम तारडे,डॉ.चेतना बहुरूपी,डॉ. सोनाली हिवाळे आदी तज्ञ डॉक्टर यावेळी उपस्थित होते.
