। नवी दिल्ली । दि.03 मार्च । मध्यंतरी, पावसाचा आणि कडाक्याच्या थंडीचा अंदाज खरा ठरल्यानंतर आता हवामान खात्याने पुढील तीन महिने उन्हाच्या झळा तिव्र होणार असल्याचा अंदाज दिल्याने यानुसार, मार्च ते मे या काळात दिवसा आणि रात्रीही उष्णता वाढणार आहे.
यंदाच्या वर्षी कडाक्याचा उन्हाळा सहन करण्यासाठी तयार रहा. कारण, हवामान खात्याने येत्या 3 महिन्यांचा भयंकर गरमी वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यानुसार, मार्च ते मे या काळात दिवसा आणि रात्रीही उष्णता वाढणार आहे.
हवामान खात्याचे अतिरिक्त महासंचालक आनंद शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा कडाक्याचा उन्हाळा असल्याची माहिती देण्यात आली आहे.
हवामान खात्याचे अतिरिक्त महासंचालक आनंद शर्मा पुढे म्हणाले की, फेब्रुवारी महिन्यातील सरासरी तापमानही सामान्यपेक्षा खूपच जास्त होतं. 2006 नंतर पहिल्यांदाच फेब्रुवारीमध्ये इतकी उष्णता जाणवत आहे. ते म्हणाले की, प्रशांत महासागरात हिवाळ्यात एल निनोचा प्रभाव जास्त असल्यामुळे हिवाळाही जास्त होता. परंतु आता त्याचा परिणाम कमी होताना दिसत आहे. यामुळे उष्णता वाढेल असं तज्ज्ञांचं मत आहे.
नुकत्याच दिलेल्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार, यंदा जास्तीत जास्त तापमान सामान्यपेक्षा विशेषत: उत्तर पश्चिम भारत म्हणजेच पंजाब, राजस्थान, दिल्ली, महाराष्ट्र, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश व ईशान्य भारतातील काही भाग म्हणजे बिहार, बंगाल, झारखंड इथं अधिक राहील. अशात मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या काही भागातही हवामान गरम असू शकतं.