नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन
। अहमदनगर । दि.14 फेब्रुवारी । भिंगार कॅन्टोमेंट बोर्डच्या कार्यक्षेत्रात अद्यापही राज्य शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नसून, भिंगारकर नागरिक घरकुल, झोपडपट्टी पुर्णवसन, आरोग्य सुशिक्षित बेकार-बेरोजगारांना अर्थसहाय्य आदि योजनांपासून वंचित आहे. राज्य शासनाच्या या विविध योजनेचा लाभ भिंगारकरांना लागू करावा, असे निवेदन राज्याचे नगर विकासमंत्री ना.एकनाथ शिंदे यांना भिंगार शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने देण्यात आले आहे.
कॅन्टों.बोर्डाचे माजी उपाध्यक्ष व भिंगार कॉ.अध्यक्ष अॅड.आर.आर.पिल्ले, प्रदेश सदस्य शामराव वाघस्कर यांनी ना.शिंदे यांना निवेदन देतांना कॅन्टोंमेंटला महाराष्ट्र सरकारच्या योजनेचा लभ मिळवेत याबाबत आग्रह धरला.
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर गतवर्षापर्यंत देशातील 62 कॅन्टों.बोर्ड कार्यक्षेत्राला केंद्र व राज्य सरकारच्या योजना लागू नव्हत्या, मात्र गतवर्षी 26 ऑगस्ट 2020 रोजी संरक्षण मंत्री ना. राजनाथसिंह यांनी देशातील सर्वच्या सर्व 62 कॅन्टों.ला केंद्र सरकारच्या योजनाचे लाभ मिळवून देण्याची घोषणा केली. केंद्राप्रमाणे राज्य शासनाच्या योजनांचे लाभ मिळावेत. प्रत्येक नागरिकांसाठी योजना असून, प्रत्यक्षात कॅन्टोंमेंट बोर्ड कार्य क्षेत्रातील नागरिक मात्र योजनेपासून दूर आहेत. त्यांना योजनेचा लाभ देऊन मुख्य प्रवाहात आणणे आणि येथील नागरिकांचा विकास करावा, असे निवेदनात म्हटले आहे.
सन 2006 मध्ये मनमोहनसिंग पंतप्रधान असतांना कॅन्टोंमेंटला केंद्र व राज्य सरकारच्या योजना लागू करण्याचा निर्णय घेतला होता, त्याची अंमलबजावणी 26 ऑगस्ट 2020 रोजी सुरु झाली. परंतु महाराष्ट्रातील 7 कॅन्टोमेंटला राज्य शासनाच्या योजना लागू नाहीत. शेजारच्या मध्यप्रदेश सरकारने तेथील कॅन्टोमेंटला योजना लागू केल्या आहेत. त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य सरकारने कृती करावी, अशी भिंगारकरांची अपेक्षा आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
अॅड.पिल्ले यांच्या नेतृत्वाखाली ना.शिंदे यांना नगरच्या नियोजन भवनात निवेदन दिले. निवेदनावर शामराव वाघस्कर, अनिल परदेशी, रिजवान शेख, अनिल वर्हाडे, संतोष धीवर, निजाम पठाण, संजय झोडगे, अॅड.साहेबराव चौधरी, रमेश त्रिमुखे, सोपान साळूंके, महिला अध्यक्षा मार्गारेट जाधव, किरणताई आळकुटे, संजय खडके, दिपक लोखंडे, संतोष कोलते, नवनाथ वेताळ, जालिंदर आळकुटे, फिरोज खान, संतोष फुलारी, सुभाष त्रिमुखे आदिंच्या सह्या आहेत.