‘भंडारदरा निळवंडेतून मिळणार पाच आवर्तने’

नगर, (दि.27 डिसेंबर) : जिल्ह्यातील लाभक्षेत्र विकास प्राधिकरणा अंतर्गत जिल्ह्यातील भंडारदरा प्रकल्प (प्रवरा कालवे), प्रकल्पावरील रब्बी व उन्हाळा हंगाम 2020-21 च्या कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे (ऑनलाइन) गुरुवारी पार पडली.

त्यात भंडारदरा धरणातून शेतीसाठी रब्बी हंगामात दोन आणि उन्हाळी हंगामासाठी पाण्याची तीन आवर्तने सोडण्यात येणार आहेत. भंडारदरा निळवंडे धरणातून चालू वर्षी 18 टीएमसीपेक्षा अधिक पाणी असल्याने रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी पाण्याची एकूण 5 आवर्तने सोडण्यात येणार असल्याचे आमदार लहू कानडे यांनी सांगितले.

भंडारदरा धरणाच्या पाणी नियोजनात रब्बी हंगामासाठी दोन आणि उन्हाळी हंगामासाठी तीन आवर्तने देण्यात येणार आहे. रब्बी हंगामासाठी 27 दिवसांची सव्वा तीन टीएमसीच्या दोन आवर्तनांचा यात समावेश असून उन्हाळी आवर्तनात साडेतीन आणि एक टीएमसीच्या समावेश राहणार आहे. उन्हाळी हंगामातील कालावधी हा मागणीनुसार असणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post