महाराष्ट्रात लवकरच 5295 पोलीस हवालदार पदांची भरती होणार : अनिल देशमुख

मुंबई, (दि.28 डिसेंबर) : कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्था कोलमडली असून बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने राज्यात 12 हजार 500 पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतला होता. यांपैकी 5 हजार 292 पोलीस हवालदार पदांची भरती करण्याचे आदेश लवकरच देण्यात येतील, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले आहेत.

तसेच राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये मोठया प्रमाणात गुन्हे घडत असतात असा आरोप केला जातो. मात्र, काही वर्षांच्या तुलनेत येथील गुन्हेगारीचे प्रमाण झपाटयाने कमी झाले आहे. नागपूरमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर येथे पोलीस यूनिटची स्थापना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, नागपूर शहरातील गुन्हेगारीच्या आलेख बाबत अनिल देशमुख यांनी भाष्य केले आहे. नागपूरमध्ये गेल्यावर्षी 90 हत्या, 147 चोरी, 56 सोन साखळी चोरीची नोंद झाली होती. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी नागपूरमध्ये 88 हत्या, 127 चोरी, 21 सोन साखळी चोरीच्या तक्रारी आल्या आहेत. त्याचप्रमाणे बलात्काराच्या घटनेतही घट झाली आहे. नागपूरमध्ये गेल्यावर्षी 163 बलात्काराच्या घटना घडल्या होत्या. तर, यावर्षी 152 बलात्काराच्या घटनांची नोंद झाली आहे, असेही अनिल देशमुख म्हणाले आहेत.

महाराष्ट्र पोलिसांना गस्तीसाठी मदतगार ठरेल अशा सेल्फ बॅलेंसिंग इलेक्ट्रिक स्कुटर्स पोलिसांच्या ताफ्यात दाखल करण्यासाठी गृहप्रशासन प्रयत्नशील आहे. आज मी स्वतः ही स्कुटर चालवून तिच्या गुणवत्तेची व कार्यक्षमतेची पाहणी केली. या सुक्टर्समुळे पोलीस दल निश्चितच गतिमान होईल, अशा आशयाचे ट्विट अनिल देशमुख यांनी आज केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post