दोन बालकांचा विहिरीत पडून मृत्यू


नगर, (दि.15 नोव्हेंबर) : श्रीगोंदा येथील कोळगाव गावातील लगडवाडी परिसरात विहिरीमध्ये पाय घसरून दोन भावंडांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येचाल घडल्याने गावात शोककळा पसरली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील लगडवाडी परिसरात राहणार्‍या कांतीलाल सोनवणे यांची दोन लहान मुले आविष्कार सोनवणे व कार्तिक सोनवणे हे दोघे घराशेजारी असलेल्या विहिरीजवळ खेळत असताना पाय पाय घसरून पडले.


ते बराच वेळ आढळून न आल्याने सोनवणे परिवाराने आपल्या लेकरांची शोधमोहीम सुरू केली. यातील आविष्कार याचा मृतदेह पाण्यावरती तरंगताना आढळून आल्याने त्यानंतर कुटुंबीयांना हा धक्कादायक प्रकार लक्षात आला. 

 

विहरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने चार वर्षीय कार्तिक याचा मृतदेह सापडत नसल्याने मृतदेह शोधण्याचे काम स्थानिक तरुणांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत केले. शनिवारी रात्री दोन वाजता कार्तिकचा मृतदेह विहीरातून बाहेर काढण्यात आला. या चिमुकल्यांचे मृतदेह पाहून आई-वडीलांनी हंबरडाच फोडला.

Post a Comment

Previous Post Next Post