| मुंबई | दि.०७ मार्च २०२५ | महाराष्ट्रात महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात अनेक मोठे बदल करण्यात येत आहेत. सुरुवातीला आयपीएस अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. आता आयएएस अधिकार्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. आजच्या बदल्यामध्ये ८ आयएएस अधिकार्यांच्या बदल्या झाल्या आहेत.
अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची साखर आयुक्तपदी बदली झाल्यानंतर नगरला जागा रिक्त होती. सालीमठ यांच्या जगेवर नवीन कोण जिल्हाधिकारी म्हणून येणार्या याची उत्सुकला सर्वांनाच होती, आज जिल्हधिकारी म्हणून यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची नियुक्ती झाली आहे.
कोणत्या अधिकार्यांच्या बदल्या झाल्या
१. राधाविनोद शर्मा यांची मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
२. एम.जे. प्रदीप चंद्रेन यांची पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
३. बाबासाहेब बेलदार यांची अल्पसंख्याक विकास आयुक्त, छत्रपती संभाजीनगर या पदावर नियुक्त करण्यात आले आहे.
४. जगदीश मिनियार यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
५. गोपीचंद कदम यांची अतिरिक्त आदिवासी आयुक्त, ठाणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
६. वैदेही रानडे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
७. डॉ. अर्जुन चिखले यांची फी नियामक प्राधिकरण, मुंबई, सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
८. डॉ. पंकज आशिया यांची अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.