। अहमदनगर । दि.27 मे । आज कोरोना -19 या जागतिक महामारीत संसर्ग जालेल्या रुग्णांचा मृत्यू झाल्याने आज त्यांच्या कुटुंबीयांना मृत्युच्या दाखल्यासाठी तासंन तास रांगेत उभे राहवे लागत आहेत. तरी देखिल दाखला मिळण्याची शाश्वती नसते. मात्र, यावर मनपाने नियोजन करुन मृत्यू पावलेल्यांचा दाखल घरपोहच द्यावा अशी मागणी शिव राष्ट्र सेनेच्या वतीने संतोष नवसुपे यांनी आयुक्तांकडे केली आहे.
मृत्यूच्या दाखल्यासाठी मनपा बाहेर गर्दी होत असून यातून बाधा होण्याची शक्यता आहे. त्या पासून मनपाच्या क्लार्क व कामगांराना सुध्दा कोरोना संसर्ग होण्याचा धोका निर्माण होऊ शकातो. तरी आम्ही शिव राष्ट्र सेना पक्षाच्या वतीने या ठिकाणी प्रशासनाला अशी मागणी करतो की, कोरोना -19 या महामारीत मृत्यु जालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना घर पोहत व पोस्टाने दाखले देण्याची व्यवस्था करावी कारण या काळात मनपाने दुःखी झालेल्या नातेवाईकांना त्यांची पिळवणूक अथवा वनवण होणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी शिव राष्ट्र सेना पक्षाचे शहराध्यक्ष अरून खिची यांनी मागणी केली आहे.
या वेळी दलित आघाडी जिल्हाध्यक्ष माझी नगरसेवक अनिल शेकटकर यांनी आयुक्त शंकरराव गोरे व उपायुक्त डांगे यांना कोरोना -19 या संसर्गजन्य पॉजिटीव संख्या 4000 हजारावर गेली होती. ती आज मितीला 83 झाली आहे. हे यशस्वी प्रयत्न केले आहे. तरी कोवीड रुग्णांचे कोवीड मुळे मृत्यु झाले त्यांचे दाखले घरपोहच देण्यात यावे ही व्यवस्था मनपाने करावी यात नागरिकांना ज्या चकरा माराव्या लागत आहे. त्या वाचतील व नागरीकांची होणारी पिळवणूक होणार नाही. अक्कासाहेब
