। अहमदनगर । दि.20 एप्रिल । कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. मनपा हद्दीत देखील रग्णांची संख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे नगरसेवक निधी रोख करून कोविड रुग्णांसाठी
नगरसेवकांनी सुचवलेल्या कामांसाठी वापरण्यात यावा, अशी मागणी माजी सभापती सचिन जाधव व माजी उपमहापाैर अनिल बोरूडे यांनी आयुक्त शंकर गोरे व महापाैर बाबासाहेब वाकळे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
कोरोना विषाणूपासून कोणताही धोका होवू नये यासाठी मनपा स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. शासनाकडून येणाऱ्या अटी शर्तीचे पालनही नागरिकांनी करणे गरजेचे आहे. कोरोना रूग्णांवर उपाय योजना करण्यासाठी निधीची आवश्यकता भासत आहे.
Tags:
Breaking
