जिल्ह्यात आज १७१ रुग्णांना डिस्चार्ज तर २०५ बाधितांची रुग्णसंख्येत भर

आतापर्यंत ५६ हजार १५८ रुग्ण बरे होऊन परतले घरी

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१४ टक्के


नगर, (दि.10 नोव्हेंबर) :  अहमदनगर  जिल्ह्यात आज १७१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५६ हजार १५८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१४ टक्के इतके झाले आहे. 

 

दरम्यान, काल (सोमवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २०५  ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १३६८  इतकी झाली आहे.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४७, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २२ आणि अँटीजेन चाचणीत १३६ रुग्ण बाधीत आढळले.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २२, जामखेड ०१,  नगर ग्रामीण ३, नेवासा ०१, पारनेर ०२, पाथर्डी ०९, राहुरी ०१, शेवगाव ०१,  श्रीगोंदा ०३, श्रीरामपूर ०१, मिलिटरी हॉस्पिटल ०२ आणि इतर जिल्हा ०१  अशा रुग्णांचा समावेश आहे.


खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०५, अकोले ०१  कर्जत ०१, नगर ग्रामीण ०६, पाथर्डी ०२,  राहाता ०४, संगमनेर ०१, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर  ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.


अँटीजेन चाचणीत आज १३६  जण बाधित आढळुन आले. यामध्ये मनपा ०९, अकोले २३, जामखेड ३१, कर्जत ०६ , कोपरगाव ०१, नगर ग्रामीण ०४,  नेवासा ०५, पारनेर ०४, पाथर्डी २२, राहता ०५, राहुरी ०३, संगमनेर ०९, शेवगाव १२, श्रीगोंदा ०१ श्रीरामपूर ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.


दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १३, अकोले १८ जामखेड ०७, कर्जत २०, कोपरगाव ०२,  नगर ग्रा.०६, नेवासा ०९, पारनेर ०६,,पाथर्डी १७, राहाता ०२, राहुरी ०१, संगमनेर १५, शेवगाव १२, श्रीगोंदा १९, श्रीरामपूर २२ आणि  कॅन्टोन्मेंट ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.


*बरे झालेली रुग्ण संख्या:५६१५८

*उपचार सुरू असलेले रूग्ण: १३६८

*मृत्यू:८८८

*एकूण रूग्ण संख्या:५८४१४

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

दिनांक: १० नोव्हेंबर २०२०, रात्री ०७ वाजता

घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा

प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा


स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या

अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा


खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका

माझे कुटुंब माझी जबाबदारी

Post a Comment

Previous Post Next Post