ज्ञानेश्वरी वाघ, आरती केदार आणि अंबिका वाटाडे यांची
आसाम येथे होणार्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड
नगर (दि.12) : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील क्रिकेट कोच शशिकांत निर्हाळी यांच्या अॅकॅडमीत प्रशिक्षण घेणार्या ज्ञानेश्वरी वाघ, आरती केदार आणि अंबिका वाटाडे यांची आसाम येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी 19 वर्षाखालील मुलींच्या महाराष्ट्र संघात निवड झाली.
तालुका स्तरावरावरून राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करत त्यांनी त्यांनी तालुका आणि जिल्ह्याचा नावलौकीक वाढवला. अहमदनगर जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब असून त्यांनी संपादन केलेल्या यशाबद्दल त्यांचे अहमदनगर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार. अरुणकाका जगताप, प्रा.माणिकराव विधाते, सुमतीलाल कोठारी, गणेश गोंडाळ आणि प्रतापकाका ढाकणे यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.
Tags:
Maharashtra
