जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

 


। अहिल्यानगर । दि. 14 नोव्हेंबर 2025 ।  जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी दादासाहेब गिते यांनी मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७(१)(३) अन्वये १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत (रात्री १२ वाजेपर्यंत) शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केला आहे.

सदर आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, मिरवणुका व प्रेतयात्रांमधील जमावास लागू होणार नाही. तसेच पोलीस अधिकारी, कामावर असलेले शासकीय अधिकारी-कर्मचारी आणि सभा किंवा मिरवणूक काढण्यासाठी रीतसर परवानगी घेतलेल्या व्यक्तींनाही हा आदेश लागू होणार नाही.या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post