। अहिल्यानगर । दि.22 जानेवारी 2025। पुणे येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय वन्यजीव संरक्षण परिषदेत अहिल्यानगरच्या अॅड.राजश्री महराज कडलग यांना माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
मागील बारा - तेरा वर्षांपासून राजश्री कडलग या कीर्तन, प्रवचन तसेच व्याख्यानांद्वारे वन्यजीव, पर्यावरण, तसेच मनुष्य संरक्षणासाठी प्रबोधन करतात. या कार्याबद्दल माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी, गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा आणि सर्पमित्र वनिता बोराडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी राजेंद्र महाराज कडलग, रोहित महाराज अकोलकर, बाबासाहेब धोत्रे, रमेश अग्रवाल, बापू पडळकर, अभय माटे, विजय वरुडकर, रमेश अग्रहवाल, पद्मश्री गिरीष प्रभुणे आदी उपस्थित होते. राजश्री कडलग यांना जिजाऊ रत्न पुरस्कार प्रदान झाल्यानंतर त्यांच्यावर अहिल्यानगर जिल्हयामधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.