साठेखत केले, खरेदी देण्यास टाळाटाळ, पाच लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल


। अहमदनगर । दि.20 जुन । येथील मोची गल्लीत विक्रीस निघालेल्या तीन गाळ्यांचे नोव्हेंबर २०१४ मध्ये साठेखत करून पाच लाख रूपये घेऊन सुमारे आठ वर्ष खरेदी देण्यास टाळाटाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी व्यावसायिक हरिभाऊ बाबुराव डोळसे (वय ६२, रा. जुना बाजार) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मुरलीधर मोरन्दमल लुल्ला (वय ५८, रा. सदर बाजार, भिंगार) याच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरिभाऊ डोळसे यांचे मोची गल्ली येथे कापड दुकान आहे. दुकानाचे शेजारी कल्पतरू शॉपिंग आर्केट बी विंग अपार्टमेंटमध्ये तीन गाळे आहेत. मुरलीधर लुल्ला याने हे गाळे विक्री करण्याकरीता काढले असल्याने डोळसे यांनी तीन गाळे एकुण एक कोटी रूपयास घेण्यासाठी तयार झाले. दोघांमध्ये चंद्रकांत मुथा यांनी व्यवहार व्हावा म्हणून भेट घालून दिली व ओळख करून दिली होती.

२५ नोव्हेंबर २०१४ रोजी डोळसे व लुल्ला यांनी अ‍ॅड. विजय मुनोत (बारातोटी कारंजा) यांच्याकडे या तिन्ही गाळ्यांची साठेखत केले होते. त्यामध्ये सहा महिन्यानंतर व्यवहार झालेली रक्कम व वरिल मिळकतीची खरेदी करून देईल, असे १०० रूपयाच्या बॉन्डवर लुल्ला यांनी प्रतिज्ञा पत्र लिहून दिले होते.

त्यावेळी डोळसे यांनी त्याला हातोहात दोन लाख रूपये रोख दिले व स्टेट बँक ऑफ इंडियाचा तीन लाखांचा चेक, असे एकूण पाच लाख रूपये दिले होते. हा व्यवहार चंद्रकांत हरदचंद मुथा (रा. गंजबाजार) व अशोक गदादे (रा. सावेडी) यांचे समक्ष झाला होता. डोळसे यांनी दिलेला चेक वटलेला असून लुल्ला यांनी ते पैसे काढून घेतले होते.
 

Post a Comment

Previous Post Next Post