खते, बियाणे बाबत तक्रारी असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन


। अहमदनगर । दि.09 जून 2022 । शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२२ साठी खते व बियाणे निविष्ठा उपलब्धतेत अडचणी उदभवल्यास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी ९८९०६०७४८९ या भ्रमणध्वनी क्रमांकावर व जिल्हा परिषदेतील ७५८८१७८८४२ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. जगताप यांनी या प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post