जिल्ह्यातील 11 गुंडांना पोलिसांनी दाखवला जिल्ह्याबाहेरचा रस्ता...

जिल्ह्यातील 11 गुंडांना पोलिसांनी दाखवला जिल्ह्याबाहेरचा रस्ता...

चार टोळ्यांवर केली हद्दपारीची कारवाई

। अहमदनगर । दि.09 जून 2022 । जिल्ह्यात संघटीतपणे टोळी तयार करुन गैरकायद्याची मंडळी जमवणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, शिवीगाळ करणे, जिल्हादंडाधिकारी यांच्या प्रतिबंधत्मक आदेशाचे उल्लंघन करणे, मारामारी करणे इत्यादी मालाविरुद्धचे व शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे करुन दहशत निर्माण करणार्‍या चार टोळ्या व त्यातील सदस्यांना जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश काढले आहेत.

टोळीप्रमुख संदीप भाऊसाहेब घुगे (वय 39 वर्षे, रा. मालुंजे ता. संगमनेर जि. अहमदनगर) व त्याच्या टोळीतील इतर 5 सदस्यांना पोलिस अधीक्षक पाटील यांनी संगमनेर तालुका, राहाता तालुका व राहुरी तालुका हद्दीतून 1 वर्षाकरीता हद्दपार केले आहे. संगमनेर तालुका पोलिस स्टेशनने प्रस्ताव सादर केला होता.

त्यानुसार संदीप घुगे याच्यासह मारूती सगाजी नागरे (वय 62 वर्षे, रा. मालुंजे ता. संगमनेर जि. अहमदनगर), विजय बच्चु डोंगरे (वय 44 वर्षे रा. मालुंजे ता. संगमनेर जि. अहमदनगर), अमोल सोमनाथ डोगरे (वय 28 वर्षे रा. मालुंजे ता. संगमनेर जि. अहमदनगर), दीपक सोमनाथ डोगरे (वय 27 वर्ष रा. मालुंजे ता. संगमनेर जि. अहमदनगर), शशिकांत ऊर्फ मंगेश शिवाजी नागरे (वय 22 वर्षे रा. मालुंजे ता.संगमनेर जि. अहमदनगर) यांना हद्दपार करण्यात आले आहे.

बेलवंडी पोलिस स्टेशनच्या प्रस्तावानुसार  गंभीर स्वरुपाचे गुन्हे संघटीतपणे करून दहशत निर्माण करणार्‍या अक्षय सुभाष सोनवणे (वय 26 वर्ष, रा. वाडेगव्हाण, ता. पारनेर, जि. अहमदनगर) याला नगर जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.

भिंगार पोलिस स्टेशन व परिसरात गंभीर स्वरुपाचे गुन्हे संघटीतपणे करून दहशत निर्माण करणार्‍या अविनाश विश्वास जायभाय (वय 24 रा. दुधसागर सोसायटी, केडगाव, अहमदनगर), ऋषिकेश अशोक बड़े (वय 23 रा. भगवान बाबा नगर सारसनगर, अहमदनगर), नितीन उर्फ किरण किसन लाड (वय 22 रा. भगवान बाबा नगर, सारसनगर, अहमदनगर)

 यांना भिंगार कॅम्प पोलिस यांच्या प्रस्तावानुसार नगर जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार केले आहे. या तीन टोळ्यासह छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अवमानकारक वक्तव्य करणार्‍या श्रीपाद छिंदम व त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम यांनाही एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

----------------

खते, बियाणे बाबत तक्रारी असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन 

गावठी कट्टा बाळगणारा जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

बारावीत नापास झाल्याने युवकाची आत्महत्या  

Post a Comment

Previous Post Next Post