बसमधून प्रवासादरम्यान 2 महिलांनी पळविले सव्वातीन तोळ्याचे दागिने


। अहमदनगर । दि.16 जुन । राहुरी ते नगर दरम्यान एस.टी.बसने प्रवास करणार्या दोन महिलांनी सहप्रवासी महिलेचे सव्वातीन तोळ्याचे दागिने व रोख रक्कम असलेली कमरेची पिशवी पळविल्याची घटना सोमवारी (दि.13) दुपारी दोन ते तीन वाजेच्या दरम्यान घडली.

दागिने चोरणार्या दोन्ही संशयित महिला नगर शहरातील सावेडी बस स्टॉपवर बसमधून उतरल्या होत्या. याबाबत दागिने चोरीला गेलेल्या महिलेचा मुलगा अजू विठ्ठल दातीर (मुळ रा. डिग्रस, ता. राहुरी, हल्ली रा. कारागृह वसाहत, नगर रोड, जि. बीड) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.14) दुपारी फिर्याद दिली आहे.

सोमवारी दातीर यांची आई राहुरीहून नाशिक ते पारनेर बसने नगरला येत होत्या. त्यावेळी त्यांच्या जवळ 2 अनोळखी महिला बसलेल्या होत्या. दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास त्या सावेडी बस स्टॉपवर उतरल्या.

त्या दोन महिलांनीच आपल्या आईच्या जवळील बॅगेत ठेवलेली सव्वातीन तोळे सोन्याचे दागिने, तीन हजार रूपये रोख रक्कम असलेली त्यांची कंबरेची पिशवी लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून 2 अनोळखी महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

--------------

आषाढी एकादशीनिमित्त एसटी महामंडळच्या ४ हजार ७०० विशेष गाड्या ... 

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नी लवकरच बैठक ...

पर्यटनातून जपले सामाजिक भान...

Post a Comment

Previous Post Next Post