काँग्रेसचा समतेचा विचारच देशाला वाचू शकतो भारत जोडो अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे : नामदार बाळासाहेब थोरात
। अहमदनगर । दि.30 मे 2022 । विविध धर्म आणि संस्कृतीने संपन्न असलेल्या देशापुढे आज धार्मिक धार्मिक तेढ निर्माण करत समाजा समाजात फूट पाडण्याचे काम सुरू झाले असून हे या देशातील सामान्य माणसाला परवडणारे नाही. तरी या देशातील सर्वसामान्य माणसाच्या विकासासाठी सर्वांना समान न्याय देणारा राज्यघटनेच्या आधारावर देशाच्या एकात्मतेला न्याय देण्याचे काम करणारा काँग्रेस पक्षाचा समतेचा विचार या देशाला तारू शकतो. त्यासाठी उदयपूर डिक्लेरेशन नुसार सुरु करण्यात आलेल्या "भारत जोडो" यात्रेत जिल्ह्यातील काँग्रेसजनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारणी समोर ते बोलत होते. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आ. डॉ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस उत्कर्षा रुपवते, दीप चव्हाण, विनायक देशमुख, करण ससाने, सचिन गुजर, राजेंद्र नागवडे, ज्ञानदेव वाफारे, प्रताप शेळके इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
आमदार थोरात आपल्या भाषणात पुढे म्हणाले, देशाच्या पातळीवरील वाढती महागाई वाढती बेरोजगारी व अर्थव्यवस्थेवर आलेले प्रचंड मोठं संकट पाहता देशातल्या सर्वसामान्य माणूस या सर्व प्रश्नांनी त्रासला असून या संकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी काँग्रेस पक्षाने जयपुर डिक्लेरेशन अंतर्गत "भारत जोडो अभियान" सुरू केले असून हे अभियान प्रत्येक घराघरापर्यंत जाण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम करावे असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी बोलताना आ. डॉ. सुधीर तांबे म्हणाले, अहमदनगर जिल्हा काँग्रेसच्या वतीने पुढील शंभर दिवसात "भारत जोडो" अभियानांतर्गत जिल्हा पातळी पासून गावपातळीपर्यंत विविध शिबिरे व प्रशिक्षणाचे कार्यक्रम सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून हा उपक्रम राज्याने स्विकारावा अशी भूमिका त्यांनी मांडली.
आ. लहू कानडे आपल्या भाषणात म्हणाले, अहमदनगर जिल्ह्यात भारत जोडो अभियानांतर्गत जिल्ह्यातील मागासवर्गीय भटका वंचित समाजापर्यंत हा काँग्रेसचा विचार घेऊन जाण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात यावेत व या वंचित समाजाच्या तरुण माणसांपर्यंत हा समतेचा विचार घेऊन जाण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या गावपातळीवर कार्यकर्त्यांनी काम करावे अशी भूमिका त्यांनी मांडली.
अहमदनगर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या १०० दिवसाच्या भारत जोडो अभियानाबाबत तपशीलवार माहिती जिल्हा काँग्रेसचे समन्वयक श्री ज्ञानदेव वाफारे यांनी मांडली पुढील १०० दिवसात जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हा पातळी तालुका पातळी व पंचायत समिती ज्ञानाच्या प्रत्येक मंडळ पातळीवर काँग्रेस पक्षाची शिबिर व प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार असून भूत पातळीपर्यंत प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडली याप्रसंगी लताताई डांगे, मनोहर पोटे, कैलास शेवाळे, अभिजित लुणिया, किरण पाटील, प्रवीण घुले, संपतराव म्हस्के, जयंत वाघ, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, राहुल उगले, सुभाष सांगळे, नासिर शेख, अरुण पाटील नाईक, माणिकराव मोरे, बाबासाहेब दिघे, अमोल फडके, दादापाटील वाकचौरे, शिवाजी नेहे, संभाजी माळवदे, संभाजी रोहोकले, दीपक भोसले, सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष योगेश दिवाने इत्यादी मान्यवर व जिल्ह्यातील काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
-----------------
जवान प्रशांत जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार