प्रवासात कार एका दरीत कोसळून भीषण अपघात ; पाच जणांचा मृत्यू


। ठाणे । दि.30 मे 2022 । मृतक पुनमिया कुटूंब ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयासमोर वास्तव्यास होते. या कुटूंबातील चार जण सहलीसाठी गुरुवारी विमानाने सिक्कीमला गेले. तेथे त्यांनी भाडेतत्वावर एक कार घेतली. मात्र, प्रवासात ही कार एका दरीत कोसळून भीषण अपघात झाला.

 हा अपघात इतका गंभीर होता की कारमधील पाचही व्यक्तींचा मृत्यू झाला. सोमवारी अपघातात मृत्यू झालेल्या सर्वांचे मृतदेह ठाण्यात आणले जाणार आहेत अशी माहिती माहिती जैन धर्मीय सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र जैन यांनी दिली.

मृतक सुरेश पन्नालालजी पुनमिया यांच्या सोबत त्यांची पत्नी तोरण, मुलगी हिरल(१४) आणि मुलगी देवांशी (१०) तसेच जयन अमित परमार यांच्यासह ठाण्यातील अन्य पर्यटक सिक्कीमला पर्यटनस्थळी गेले होते. शनिवारी संध्याकाळी इच्छितस्थळी पोहचण्यापूर्वीच सुरेश पुनमीया हे प्रवास करीत असलेल्या कारला अपघात झाला.

यात सुरेश पुनमीया यांच्या कुटुंबातील चारजनांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या सोबत गाडीत असलेले अमित परमार यांचाही मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अमित परमार हे आधी दुसऱ्या गाडीत बसले होते मात्र गाडी थांबल्यानंतर ते पुनमीया असलेल्या गाडीत बसले असे सांगण्यात येत आहे.

---------------

हर्षवर्धन सदगीरने पटकावले विजेतेपद 

विनापरवानगी रॅली काढणे राणा दाम्पत्याला भोवले

वारसा हक्काने कर्मचार्‍यांना मनपा सेवेत सामावून घेण्यात यावे  

काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळेंचे बंधू सागर काळे यांचे दुःखद निधन

Post a Comment

Previous Post Next Post