। अहमदनगर । बोधेगाव । दि.17 सप्टेंबर । शेवगाव तालुक्यातील पूर्व भागातील बोधेगाव येथील बोधेगाव हातगाव सरहद्दीवर शिव रस्त्याने जाणारे पावसाचे पाणी शेतकऱ्यांनी अडवल्याने बोधेगाव शिवारातील रामनाथ किसन वारकड, उमेश केकान, सुभाष जगन्नाथ घोरतळे , आंबादास गर्कळ, आदी शेतकऱ्यांच्या खरिपातील उभ्या पिकात पाणी साचून पाण्याचे तळे निर्माण झाले असुन उभ्या पिकात गेल्या आठ दिवसा पासुन गुडघाभर पाणी साचल्याने पिकाच्या ममुळ्या सडून पिके भुईसपाट झाली आहेत.
या शेतकऱ्याचे १४ एकर क्षेत्र बाधीत झाले आहे तर बाळासाहेब गाढे, शिवनाथ गाढे, दशरथ गाढे, भिमा गाढे, अर्जुन गाढे, वसंत टेकाळे, तुकशीराम टेकाळे, ज्ञानेश्वर गाढे, सिराज सय्यद, या शेतकऱ्यांची वहिवाट रस्ता बंद झाला आहे. याबाबत या शेतकऱ्यांनी शेवगांव च्या तहसिलदार यांना लेखी निवेदन देवून आपली कैफियत मांडली आहे .
त्यात म्हटले आहे की हातगाव शिवारातील शेख अहमद जानू महंमद इनामदार व त्यांच्या मुलांनी नैसर्गीक रित्या जाणारे शिव रस्त्याचे पाणी आडवा बांध टाकून आडवले आहे त्यामुळे सदरील उभ्या पिकात पाणी साचुन संपूर्ण पीके पाण्यात गेली आहेत त्यामुळेपावसाचे नैसर्गीक जाणारे पाणी अडवणारा बांध काढावा व शेत वहिवाटी साठी मोकळा करून दयावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
मे महिण्यात तहसिलदार अर्चना पागीरे यांनी शिव रस्त्याची पाहणी केली होती व शेख इनामदार यांना बांध काढण्याचे सांगीतले होते पण अतिक्रम काढले गेले नाही शेवगावच्या तहसिलदारांनी दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांचे पिकाचे मोठे नुकसान झालेआहे. तहसीलदार यांनी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी संबधित शेतकऱ्यांनी केली आहे
