पाणीपट्टी वाढ करणार्‍या मनपा आयुक्तांना हटवा : भुतारे

। अहिल्यानगर । दि.24 फेब्रुवारी 2025 । मनपाचे आयुक्त यशवंत डांगे यांनी ठराव करून पाणीपट्टी दरवाढ केली आहे. ही दरवाढ नागरिकांवर अन्याय करणारी आहे, असे नितीन भुतारे यांनी म्हटले आहे.एका बाजूला शहरात कल्याण रोड, सारसनगर, केडगाव, अशा अनेक भागात आठ ते दहा दिवसांनी पाणी येते.पाणी 24 तास नागरिकांना मिळत नाही. 15 वर्षापासून सुरू असलेली फेज टु योजनेचे काम अपूर्ण आहे. 

शहरात अनेक भागात टँकर द्वारे पाणीपुरवठा होतो हे सर्व असताना कोणत्या प्रकारे पाणी पट्टी दरवाढ आयुक्तांनी केली हे समजण्या पलीकडे आहे. पाणी पट्टी दरवाढ वाढवून पैसे जमा करायचे आणि पाणी पुरवठा लाईनवर देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करायचा, असे अनेक दिवसापासून मनपात सुरू आहे, असा आरोप भुतारे यांनी केला.

हे सर्व निर्णय आयुक्त स्वतःच्या प्रसिद्धीसाठी घेतात व त्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवितात, हे निर्णय घेताना शहरातील जनतेला व्यवस्थित, सुरळीत, दररोज पाणी मिळते का? हे पाहणे गरजेचे आहे. हे कुठे त्यांनी पाहिले नाही व पाणी पट्टी दरवाढ केली, अशी दरवाढ नगरच्या जनतेला मंजूर नाही. 

अशा प्रकारे काम करणारे आयुक्त जर मनपात असतील तर अशा आयुक्तांना हटविण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. त्यांनी नगरकरांना आवाहन केले की, जनतेवर अन्याय कारक निर्णय लादणारे आयुक्त या मनपात नको. ठेकेदारांना पोसणार्‍या आयुक्तांना हटवा व नवीन कार्यक्षम आयुक्तांची या मनपात नियुक्ती करावी, असे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई- मेलव्दारे पाठविले आहे.

👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग  

Post a Comment

Previous Post Next Post