प्रवाशांनी उड्या मारल्या आगीच्या भीतीने...


। जळगाव । दि.23 जानेवारी 2025 । पुष्पक एक्सप्रेसमधील बोगीला आग लागल्याच्या भीतीने बुधवारी दुपारी काही प्रवाशांनी जळगाव-पाचोरा दरम्यान परधाडे गावाजवळ उड्या मारल्या. मात्र समोरून येणार्‍या बंगळुरू एक्सप्रेसने या प्रवाशांना चिरडल्याची घटना घडली. 

या अपघातात आतापर्यंत 11 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तसेच 40 हून अधिक प्रवासी जखमी असल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या ठिकाणी बचावकार्य सुरू करण्यात आले असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रेल्वेतर्फे अपघात प्रकरणी तातडीची मदत जाहीर
रेल्वेतर्फे अपघात प्रकरणी तातडीची मदत जाहीर करण्यात आली आहे. यात मृतांच्या कुटुंबियांसाठी 5 लाखांची मदत जाहिर करण्यात आली आहे, गंभीर जखमींसाठी 50 हजार, तर कायम अपगंत्व आलेल्या व्यक्तींसाठी 2 लाख 50 हजार रुपयांची मदत जाहिर करण्यात आली आहे.

दरम्यान अपघातातील जखमींच्या बचाव आणि मदतकार्यासाठी रेल्वे आणि जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली आहे. 

👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग

Post a Comment

Previous Post Next Post