। मुंबई । दि.23 जानेवारी 2025 । महाराष्ट्रात येणार्या बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, याची दखल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली असून, त्यांनी बांगलादेश आणि म्यानमारमधून अवैध रीतीने महाराष्ट्रात घुसखोरी करणार्या घुसखोरांविरोधात त्वरित योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, तसेच अन्य संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.
बांगलादेश आणि म्यानमारमधून अवैधरीतीने मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात येणाऱ्या घुसखोरांविरोधात त्वरित योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि अन्य संबंधित यंत्रणांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून हे निर्देश देण्यात आले.
माजी खासदार राहुल शेवाळे यांनी 28 नोव्हेंबर 2024 रोजी गृहमंत्री अमित शाह यांना लिहिलेल्या निवेदनात टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) या संस्थेकडून घुसखोरांविषयी केलेल्या सर्वेक्षणाचा उल्लेख केला होता. राहुल शेवाळे यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, TISS ने केलेल्या सर्वेक्षणानुसार, मुंबईत बांगलादेशी आणि म्यानमारमधून आलेल्या घुसखोरांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
Tags:
Breaking