पियुष संचेती यांची जेएसजेएसजी च्या रिजनल चेअरमन पदी नियुक्ती

पियुष संचेती यांची जेएसजेएसजी च्या रिजनल चेअरमन पदी नियुक्ती
 

। अहमदनगर । दि.10 जुन ।  तपकीर गल्ली येथील रहिवासी व भाजपा कार्यकर्ते पियुष रसिकलाल संचेती यांची जैन श्वेतांबर सोशल ग्रुप रजि. इंदोर ( जेएसजेएसजी) ह्या संस्थेच्या २०२२-२०२४ या द्विवार्षिक कार्यकारणी मध्ये महाराष्ट्र रिजन च्या रिजनल चेअरमन पदी नियुक्ती झाली आहे.

पियुष संचेती हे सामाजिक राजकीय क्षेत्रातील विविध पदांवर कार्यरत आहेत. ते श्री श्वेतांबर जैन कॉन्फरन्स च्या "मानवसेवा" योजनेचे आधारस्तंभ असून, जेएसएसजी च्या अहमदनगर"आनंद" चे संस्थापक अध्यक्ष आहेत, ते माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या "मन की बात" कार्यक्रमाचे अहमदनगर शहर जिल्हा मध्यमंडळ सहसंयोजक आहेत. 
 
ही सामाजिक जबाबदारी संभाळत असताना भाजयुमो अहमदनगर शहर जिल्हा कार्यकारणी सदस्य, अहमदनगर शहर जिल्हा सहशक्ती केंद्रप्रमुख तसेच भाजपा एक बूथ तीस युथ या अभियानंतर्गत  ते अहमदनगर शहर मतदारसंघात बूथ क्र.२०३ चे बूथ प्रमुख म्हणून गेली ५ वर्षांपासून काम करत आहेत. ह्या राजकीय जबाबदाऱ्या पण ते यशस्वीरित्या सांभाळत आहेत.

अश्या विविध सामाजिक राजकीय पदांवर ते सध्या कार्यरत आहेत. अत्यंत कमीवयात त्यांनी आपल्या कामातून आपल्या नावाचा अहमदनगर शहरात यशस्वी ठसा उमटवला आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल जेएसजेएसजी चे संस्थापक अध्यक्ष विजय मेहता, माजी अध्यक्ष किशोर पोरवाल नवनियुक्त अध्यक्ष विजय ललवाणी राष्ट्रीय महासचिव व जिनेंद्र की आवाज या मासिकाचे संपादक संतोष "मामा" जैन, तसेच अनेक राजकीय सामाजिक कार्य करणाऱ्या त्यांच्या हितचिंतकांनी व पारिवारिक सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

त्यांच्या ह्या नियुक्तीबद्दल बोलताना पियुष संचेती म्हटले की आज जेएसजेएसजी च्या आजच्या घडीला महाराष्ट्र रिजनमध्ये ८ शाखा कार्यान्वित आहेत, त्या मी माझ्या कार्यकाळात २५ च्या वर घेऊन जाईल असा मानस त्यांनी व्यक्त करताना, ह्या ग्रुप च्या माध्यमातून समाजातील तळागाळातील घटकास न्याय देण्याचा प्रयत्न करील असे पियुष संचेती आपल्या नियुक्ती बद्दल बोलताना म्हटले व .जेएसजेएसजी च्या सर्व वरिष्ट पदाधिकारी, त्यांचे राजकीय सामाजिक पारिवारिक मित्रांचे आभार व्यक्त केले.

ह्या ग्रुप ची स्थापना विजय मेहता यांनी २८ वर्षांपूर्वी ४ जूनला इंदोर मधून केली होती, याच्या १५० च्या जवळपास शाखा असून लवकरच २०० हुन अधिक शाखा कार्यनवयीत होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला, हा ग्रुप सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post