शेतकऱ्यांना पीक कर्जावर व्याज परतावा देणे केंद्राने सुरू करावे : पत्राद्वारे मागणी

शेतकऱ्यांना पीक कर्जावर व्याजपरतावा देणे केंद्राने सुरू करावे  : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्राद्वारे मागणी

। मुंबई । दि.31 मे 2022 । केंद्र शासनाने बँकांना पीक कर्जापोटी देण्यात येणारा २ टक्के व्याज परतावा थांबवण्याचा निर्णय घेताना कुठेही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला नाही. त्यामुळे हा व्याज परतावा परत सुरू करून केंद्राने सर्वसामान्य शेतकरी आणि जिल्हा सहकारी बँकांना दिलासा द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

व्याज परतावा बंद करण्याच्या केंद्राच्या अलीकडील निर्णयावर मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांना पत्रही दिले असून हा परतावा पूर्ववत सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. व्याज परतावा बंद झाल्याने राज्यातील ७० लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.

सोमवारी सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीतही व्याज परतावा परत सुरू करण्याबाबत ठराव करण्यात आला. केंद्राने २८ मार्च, २०२२ रोजीच्या परिपत्रकाद्वारे पीक कर्ज वाटपात बँकांना दिला जाणारा २ टक्के व्याज परतावा बंद करण्याचे आणि चालू आर्थिक वर्षापासून हा लाभ देता येणार नाही, असे सांगितले आहे. त्यामुळे चालू वर्षात बँकांना २ टक्के व्याज परतावा मिळणार नाही.

---------------

शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज द्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

मिनी ट्रॅक्टर योजना बंद करुन टेम्पो योजना सुरु करण्याची मागणी

जवान प्रशांत जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार 

Post a Comment

Previous Post Next Post