महाविकास आघाडीच्या अडचणीत वाढ; देशमुख-मलिकांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला


। मुंबई । दि.09 जुन । राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांचा राज्यसभा निवडणुकीसाठी केलेला अर्ज फेटाळला आहे. 

राज्यसभा निवडणुकीसाठी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मत देण्यासठी परवानगी मिळावी यासाठी अर्ज केला होता. ईडीने याला विरोध केला होता, यासंदर्भात आज न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने हा अर्ज फेटाळला आहे. 

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीत भाजपाने 3, शिवसेनेने 2, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी एक -  उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे.

या निवडणुकीत सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेना-भाजपा यांच्यात थेट लढत आहे. येत्या 10 जूनला मतदान होणार असून यासाठी सत्ताधारी पक्ष विशेष खबरदारी घेत आहे.

या निवडणुकीसाठी 1 मतही महत्त्वाचे असल्याने महाविकास आघाडीची 2 मते बाद झाल्याने मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी मविआ नेत्यांना आणखी कसरत करावी लागणार आहे.

---------------

कुस्तीत सुवर्णसह तीन पदके; मुला-मुलींच्या संघाने पटकावले सर्वसाधारण उपविजेतेपद 

जिल्ह्यातील 11 गुंडांना पोलिसांनी दाखवला जिल्ह्याबाहेरचा रस्ता... 

बारावीत नापास झाल्याने युवकाची आत्महत्या  

 

Post a Comment

Previous Post Next Post