यंदाही मुलींचीच बाजी! जिल्ह्याचा 94.41 टक्के निकाल


। अहमदनगर । दि.08 मे । जिल्ह्याचा बारावीचा निकाल अपेक्षेप्रमाणेच लागला आहे. यंदा मुलींनीच बाजी मारली आहे. जिल्ह्याचा बारावी परीक्षेचा निकाल 94.41 टक्के लागला आहे. त्यापैकी 96.73 टक्के मुली तर 92.72 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील सर्वांत जास्त निकाल शेवगाव तालुक्याचा 98.57 टक्के तर सर्वांत कमी श्रीरामपूर तालुक्याचा 86.76 टक्के लागला आहे. जिल्ह्यातून 63004 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 59486 इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

बहुतांशी विद्यार्थ्यांकडे मोबाईल असल्याने शाळा- महाविद्यालयात विद्यार्थी फिरकलेच नाहीत. सायबर कॅफेवर विद्यार्थ्यांनी बिल्कुल गर्दी केली नव्हती. जिल्ह्यातील तालुकानिहाय निकाल असा, अकोले 93.87, जामखेड 97.51, कर्जत 95.67, कोपरगाव 89.03, नगर 96.92, नेवासा 95.51, पारनेर 97.88, पाथर्डी 95.55, राहाता 93.83, राहुरी 90.24, संगमनेर 94.03, शेवगाव 98.57, श्रीगोंदा 92.33, श्रीरामपूर 86.76 टक्के निकाल लागला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च - एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर विषयनिहाय गुण उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच या निकालाची ऑनलाईन प्रत (प्रिंटआऊट) घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. यासोबतच विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती व पुनर्मूल्यांकन ही सुविधा देखील देण्यात आली आहे. दरम्यान, पुणे विभागीय बोर्डाचा 93.61 टक्के निकाल लागला आहे. यंदाही मुलींनीच बाजी मारल्याचे दिसून येत आहे.

----------

बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षणमंत्री : प्रा.वर्षा गायकवाड यांच्याकडून अभिनंदन 

अहमदनगर जिल्‍ह्यात अमृत सरोवर अभियान योजनेचा आरंभ

वेळीच ओळखा निसर्गाचा धोक्याचा इशारा 

Post a Comment

Previous Post Next Post