देशातील जनतेने पुन्हा एकदा भाजपवर विश्वास दाखवला : भैया गंधे

नगर येथे भाजपच्या वतीने पेढे वाटून, फटाके फोडून, रॅली काढून  जल्लोष

देशातील जनतेने पुन्हा एकदा भाजपवर विश्वास दाखवला : भैया गंधे 


। अहमदनगर । दि.11 मार्च । देशातील विविध राज्यामध्ये निकाल  ऐतिहासिक आहेत. या निकालामधून देशातील जनतेने भारतीय जनता पार्टीवर आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर जो विश्वास दाखवला आहे तो अभूतपूर्व आहे. या निवडणुकीमध्ये भाजपा विकासाच्या मुद्यावर मतदारांना सामोरी गेली होती. आपण भविष्यात काय करणार आहोत यापेक्षा मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात आपण काय विकास केला हा मुद्दा घेऊन मतदाराच्या पुढे गेली

आणि याच विकासाच्या मुद्दयावर जनतेने भाजपाला पुन्हा निवडून दिले. आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जो 2019 मध्ये जो विश्वास दाखवला पुन्हा एकदा तसाच विश्वास आजच्या निवडणुकीमधून दिसून आला. गोवा राज्यात सुद्धा राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे विजयी घोडदोड़ सुरु आहेत असे प्रतिपादन भाजपचे नगर शहरजिल्हाध्यक्ष भेया गंधे यांनी केले आहे

अनेक राज्यात भाजपने सत्ता मिळवल्याबद्दल नगर शहर जिल्हा भाजपच्या वतीने गांधी मैदान येथील भाजपच्या कार्यलयासमोर पेढे वाटून, फटाके फोडून मोठा जलोष करण्यात आला. यावेळी  शहर जिल्हाध्यक्ष भेया गंधे, जेष्ठ नेते सुनील रामदासी, वसंत लोढा जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी उपमहापौर मालनताई ढोणे, संघटन सरचिटणीस अ‍ॅड.विवेक नाईक, सरचिटणीस तुषार पोटे, महेश नामदे, उपाध्यक्ष संतोष गांधी,

शिवाजी दहिंडे, नरेंद्र कुलकर्णी, सचिन पारखी, जगनाथ निंबाळकर, अनिल सबलोक, अनिल गट्टाणी, बाळासाहेब गायकवाड, नगरसेवक प्रदीप परदेशी, रवींद्र बारस्कर, विधानसभा प्रमुख शशांक कुलकर्णी, न्याणेश्वर काळे, महेश तवले, सुरेखा विद्ये, कुसुम शेलार, सुवर्णा देशमुख, अंजली वलाकट्टी, गीतांजली काळे, निर्मला भंडारी, संध्या पावसे, रेखा मेड, छाया रजपूत, पंकज जहागीरदार,

चंद्रकांत पाटोळे, नितीन जोशी, अविनाश साखला, वसंत राठोड, सुमित बटुळे, एम डी.मेड, अशोक भोसले, दिलीप जाधव, अमोल निस्ताने यश शर्मा, अमित गाडेकर, अजय ढोणे, मंगेश घनगाळे, अभिजित ढोणे, बाबासाहेब सानप, न्याणेश्वर धिरडे आदी उपस्थित होते. यावेळी सुनील रामदासी ,वसंत लोढा ,विवेक नाईक ,अरुण मुंढे ,बाबासाहेब वाकळे ,सुरेखा विद्ये आदींनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच मुख्य बाजार पेठेतून  रॅली काढून  विजयाचा जलोष करण्यात आला

Post a Comment

Previous Post Next Post