शाळांची सक्तीची फीवसुली बंद
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा
मुंबई (दि.18) : लॉकडाऊनच्या काळात कोणत्याही शाळेने विद्याथ्र्यांकडून, पालकांकडून सक्तीने फी वसुली करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसे करताना शाळा किंवा शिक्षणसंस्था आढळल्यास जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे आता कोणत्याही शाळेला लॉकडाऊनच्या काळात सक्तीने फीवसुली करता येणार नाही. पालकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार ठप्प आहेत, अनेकांचे पगारही झालेले नाहीत किंवा अर्धेच पगार झाले आहेत. एप्रिल, मे महिना असल्याने शाळांची फी भरण्याचे दिवस आहेत. काही शाळांनी फी भरण्यासाठी पालकांच्या मागे तगादा लावला आहे. तशा तक्रारीही प्राप्त झाल्याने फी वसुलीची सक्ती कोणत्याही शाळेला करता येणार नाहीत, असे निर्देश आपण दिले आहेत. शालेय शिक्षण विभागाने तसे परिपत्रकही काढले असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
विद्यार्थी आणि पालकांकडून फी वसूल करताना सहानुभूती दाखवणे आवश्यक राहणार आहे. या निर्देशाचे कुठे उल्लंघन होत असेल तर ती बाब तातडीने जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यावी, असे आवाहनही वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार ठप्प आहेत, अनेकांचे पगारही झालेले नाहीत किंवा अर्धेच पगार झाले आहेत. एप्रिल, मे महिना असल्याने शाळांची फी भरण्याचे दिवस आहेत. काही शाळांनी फी भरण्यासाठी पालकांच्या मागे तगादा लावला आहे. तशा तक्रारीही प्राप्त झाल्याने फी वसुलीची सक्ती कोणत्याही शाळेला करता येणार नाहीत, असे निर्देश आपण दिले आहेत. शालेय शिक्षण विभागाने तसे परिपत्रकही काढले असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
विद्यार्थी आणि पालकांकडून फी वसूल करताना सहानुभूती दाखवणे आवश्यक राहणार आहे. या निर्देशाचे कुठे उल्लंघन होत असेल तर ती बाब तातडीने जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यावी, असे आवाहनही वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
Tags:
Maharashtra
