शाळांची सक्­तीची फीवसुली बंद : शालेय शिक्षणमंत्री यांची घोषणा

 
शाळांची सक्­तीची फीवसुली बंद

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

मुंबई (दि.18) : लॉकडाऊनच्या काळात कोणत्­याही शाळेने विद्याथ्­र्यांकडून, पालकांकडून सक्­तीने फी वसुली करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसे करताना शाळा किंवा शिक्षणसंस्­था आढळल्­यास जिल्­हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, असे शालेय  शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्­पष्­ट केले आहे. यामुळे आता कोणत्­याही शाळेला लॉकडाऊनच्या काळात सक्­तीने फीवसुली करता येणार नाही. पालकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार ठप्प आहेत, अनेकांचे पगारही झालेले नाहीत किंवा अर्धेच पगार झाले आहेत. एप्रिल, मे महिना असल्­याने शाळांची फी भरण्याचे दिवस आहेत. काही शाळांनी फी भरण्यासाठी पालकांच्या मागे तगादा लावला आहे. तशा तक्रारीही प्राप्त झाल्­याने फी वसुलीची सक्­ती कोणत्­याही शाळेला करता येणार  नाहीत,  असे  निर्देश  आपण  दिले आहेत. शालेय शिक्षण विभागाने तसे परिपत्रकही काढले असल्­याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

विद्यार्थी आणि पालकांकडून फी वसूल करताना सहानुभूती दाखवणे आवश्यक राहणार आहे. या निर्देशाचे कुठे उल्­लंघन होत असेल तर ती बाब तातडीने जिल्­हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यावी, असे आवाहनही वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post