। मुंबई । दि.27 एप्रिल 2024 । राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघांमध्ये काल मतदान पार पडले. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ६२.७१ टक्के मतदान झाले आहे.
दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
- वर्धा : ६४.८५ %
- अकोला : ६१.७९ %
- अमरावती : ६३.६७ %
- बुलढाणा : ६२.०३ %
- हिंगोली : ६३.५४ %
- नांदेड : ६०.९४ %
- परभणी : ६२.२६ %
- यवतमाळ-वाशिम : ६२.८७ %
Tags:
Politics